Indian film industry
चित्रपट उद्योगाच्या प्रारंभी वर्षभरात केवळ ९१ चित्रपटांची निर्मिती व्हायची. आज शंभर वर्षानंतर या उद्योगाचा चेहरामोहरा बदलला आहे. आता दरवर्षी एक हजारांपेक्षा अधिक चित्रपट तयार होत आहेत. मल्टीप्लेक्समुळे चित्रपट पाहण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. या कारणांमुळेच कमी बजेटमध्ये चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचत आहेत आणि चांगला व्यवसाय करत आहेत. याशिवाय वेगळ्या धाटणीच्या कथानकाच्या जीवावर निर्माते खर्चाच्या तीन ते चार पट अधिक कमाई करू लागले आहेत. सध्या चित्रपटाचे दिवस फिरले आहेत. रणवीर सिंहचा ‘गली बॉय’चे गाणे ‘अपना टाइम आएगा’ प्रमाणे प्रत्येक निर्माता हीच अपेक्षा बाळगून असतो.
दरवर्षी एक हजारांपेक्षा अधिक चित्रपट
भारतीय चित्रपटाला चांगले दिवसकधी येतील, असा विचार करत असाल तर सध्या अच्छे दिन आले आहेत, असे समजा. मध्यंतरीच्या काळात प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होऊ लागला होता. यात भरीस भर म्हणजे कोरोना काळाने मायानगरीची कंबर मोडली. परिणामी ओटीटीसारखा पर्याय उभा राहिला. आता सध्याची परिस्थिती पाहिली तर सिनेमासाठी चांगले दिवस आले आहेत, असे म्हणता येईल. कारण आता चित्रपटासाठी भलेमोठे कर्ज घेण्याची वेळ निर्मात्यांवर येत नाही. पूर्वी प्रसंगी एखाद्या निमार्त्याला आपले घरदार देखील विकावे लागत होते. एन. चंद्रा यांनी अंकुश चित्रपटाच्या वेळी घरातील दागिने गहान ठेवले होते. पण आता स्थिती बदलली आहे. कोणताही चित्रपट शंभर दोनशे कोटीचा व्यवसाय सहजपणे करतो, इतिहासात डोकावले तर चित्रपट उद्योगाच्या प्रारंभी वर्षभरात केवळ ९१ चित्रपटांची निर्मिती व्हायची. आज शंभर वर्षानंतर या उद्योगाचा चेहरामोहरा बदलला आहे. आता दरवर्षी एक हजारांपेक्षा अधिक चित्रपट तयार होत आहेत.
स्क्रिनची जागी आता मल्टीप्लेक्स
चांगल्या दिवसांचे एक ताजे उदाहरण पाहायचे झाल्यास शाहरूख खानचा पठाण पाहू. त्याने बंपर कमाई केली. द काश्मीर फाइल्स, द केरल स्टोरी यांनी देखील तिकीटबारीवर चांगले यश मिळवले. हें चित्रपट वादात असूनही घसघशीत कमाई केली. सारा अली खान आणि विक्की कौशल यांचा नवीन चित्रपट ‘जर हटके जरा ‘बचके’ ने देखील चांगली सुरवात केली आहे. या चित्रपटाने सुरवातीच्या तीन- दिवसांतच सुमारे २३ कोटींचा व्यवसाय केला आहे.बदला अंदाज, जुनून वही पूर्वीच्या सिंगल स्क्रिनची जागा आता मल्टीप्लेक्सने घेतली आहे. आता तिकीटाच्या खिडक्या देखील पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. आता सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. आता तर खिडकीवर न जाताही संपूर्ण शो हाऊसफुल्ल होतो. एवढा बदल होऊनही आजही टॉकीजवर जावून चित्रपट पाहणारे काही शौकीन आहेत. केवळ पिढी बदलली आहे, वेड मात्र तेच आहे. निर्मात्यांना आर्थिक फटका नाही आपल्याकडे चित्रपट निर्मितीचा ध्यास घेणारे लोक कमी नाहीत.
बिग बजेटचा चित्रपट खर्च काढतो ?
दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये भारतात पहिला चित्रपट ‘राजा हरिशचंद्र साकारला. त्यावेळी चित्रपट तयार करताना त्यांच्या पत्नीला अंगावरचे दागिने विकावे लागले होते. राजकपूर हे ‘मेरा नाम जोकर’ च्या वेळी कर्जबाजारी झाले होते. पण आता तसे काही घडत नाही. पूर्वीसारखे आर्थिक फटके आता निर्मात्यांना बसत नाही आणि बसले तरी त्यातून फारशी झळ बसत नाही. गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपट उद्योगाने कात टाकली असून एखादा चित्रपट फ्लॉप झालाच तर निर्मात्याला कर्ज फेडण्यासाठी गाडी किंवा बंगला विकण्याची वेळ येत नाही. बिग बजेटचा चित्रपट पडला तरी तो पहिल्या दोन तीन दिवसात खर्च सहजपणे निघतो.
असे होते चित्रपटांचे प्रमोशन
चित्रपटात आता कॉर्पोरेट कल्चर आतापर्यंत कलाकारांच्या नावावर चित्रपट उद्योगाचा गाडा चालायता. पण आता वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भांडवल गुंतवणुकीच्या आधारे या उद्योगाला नफा कमाविण्याच्या फॉर्म्युल्यास जोडले आहे. बिगबजेट चित्रपटाचे अडीच ते तीन हजार प्रिंट तयार केले जातात आणि ते प्रमोशन, जाहीरातबाजी, टिझर या आधारावर पहिल्या आठवड्यातच खर्च काढून घेतात. प्रदर्शनापूर्वी कलाकारांना माध्यमांशी भेटीगाठी घ्यायला लावतात. प्रकट मुलाखत देतात. प्रेक्षकांशी थेट संवाद साधत नव्या चित्रपटांचे प्रमोशन करतात. एखाद्या सार्वजनिककार्यक्रमात सहभागी होऊन नव्या चित्रपटाचे ब्रेडिंग करतात. यानुसार प्रेक्षकही टॉकीजकडे खेचले जातात. ‘फर्स्ट डे फस्ट शो ला’ तर काही कलाकार स्वत: तिकीट विक्री करत पहिल्या खेळाचे उदघाटन करतात. या आकर्षणापोटी प्रेक्षकाचे पाय आपोआप टॉकीजकडे वळतात. या सर्व गोष्टी कॉर्पोरेट कल्चरची देणगी आहे.
उद्योगात कॉर्पोरेट कल्चर
यशराज फिल्मचा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ने सपाटून मार खाल्ला. पण त्याने देशात असे काही वातावरण तयार केले की पहिल्या तीन दिवसांत बक्कळ कमाई केली. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची स्थिती देखील अशीच झाली. चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणकून पडला. परंतु कॉपराईटमधून चांगली कमाई झाली. चित्रपटाचे अर्थकारण पूर्णपणे फायद्याच्या सिद्धांतावर चालले. आता अनिवासी भारतीय देखील चित्रपट व्यवसायात पैसे गुंतवू लागले आहेत.हिट फ्लॉपचा फॉर्म्युला बदलला २००१ मध्ये सरकारने चित्रपटाला उद्योगाचा दर्जा दिला. त्यानंतर या उद्योगाने कॉर्पोरेट कल्चर धारण केले. निर्मितीपासून ते वितरणापर्यंत सर्वच टप्प्यावर बदल झाला आणि हिट व फ्लॉप चित्रपटाची संकल्पनाच बदलली.
ओटीटीसाठी वेगवेगळे हक्क
एखादा चित्रपटाचे प्रदर्शन होण्यापूर्वी सॅटेलाइट, ओव्हरसीज, म्यूझिक आणि ओटीटीसाठी वेगवेगळे हक्क विकले जातात. यामुळे प्रॉडक्शन हाऊसची जबरदस्त कमाई होते आणि एकप्रकारे प्रदर्शनाच्या अगोदरच चित्रपटाचा खर्च निघतो. प्रॉडक्शन हाऊसने तर सिनेमा व्यवसायाची परिभाषाच बदलून टाकली. या चित्रपटात पैसे गुंतविण्याची देखील पद्धत वेगळी आहे. कोणताही व्यवसाय आता चित्रपट नाही तर ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट’करते. मल्टीप्लेक्समुळे चित्रपट पाहण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. या कारणांमुळेच कमी बजेटमध्ये चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचत आहेत आणि चांगला व्यवसाय करत आहेत. याशिवाय वेगळ्या धाटणीच्या कथानकाच्या जीवावर निर्माते खर्चाच्या तीन ते चार पट अधिक कमाई करू लागले आहेत. सध्या चित्रपटाचे दिवस फिरले आहेत. रणवीर सिंहचा ‘गली बॉय’चे गाणे ‘अपना टाइम आएगा’ प्रमाणे प्रत्येक निर्माता हीच अपेक्षा बाळगून असतो.
टॉकीजवर जाण्याची होती क्रेझ
Indian film industry च्या एकेकाळी चित्रपटगृहात अनेक महिने चित्रपट चालायचे. सहा महिने चालला की सिल्वर ज्युबली आणि वर्षभर चालला गोल्डन ज्युबली साजरा केला जायचा. आता शंभर दिवस, दोनशे दिवस साजरे केले जातात. पूर्वी एखादा प्रेक्षक एकच चित्रपट चार पाच वेळेस पाहायचा. आपल्या आवडीच्या कलाकारांना सतत पाहणे त्यांना आवडायचे. मेगास्टार राजेश खन्नाला अशा प्रेक्षकांचे प्रेम खूप लाभले, ते आताच्या कलाकारांच्या नशीबी नाही. याशिवाय फर्स्ट डे फर्स्ट शो चित्रपट पाहण्याचे देखील वेड वेगळेच होते. चित्रपटगृहात तिकीट मिळवण्यासाठी होणारी मारामारी नेहमीच दिसायची. अशावेळी खिडकीतून हांत बाहेर काढत चुरगाळलेली तिकीटे पाहून प्रेक्षकांना स्वर्गीय आनंद व्हायचा. काहीवेळा एखाद्या चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी रात्रीपासूनच रांग लागलेली दिसायची. परंतु या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.